अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था आयोजित ‘साहित्य संगम सोहळा’ उत्साहात साजरा

Kailas Pingale

पेण ( सुदर्शन शेळके ) :

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था, अलिबागच्या वतीने आयोजित साहित्य संगम सोहळा पिंगळे सिटीच्या ग्रीनकिंग रिसॉर्टमध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, “समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी अशा साहित्य सोहळ्यांची आवश्यकता आहे. साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आगरी भवन निर्माण करण्यासाठी मी प्राधान्य देईन.”
साहित्यिक सुरेश भोपी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी साहित्यात समाजाचे प्रतिबिंब कसे उमटते, यावर प्रकाश टाकला आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्याची आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात कैलास पिंगळे लिखित ‘फसकी’ कादंबरीचे कवयित्री मिनाक्षी तांडेल यांच्या हस्ते प्रकाशन झाले, तर सुरेश भोपी लिखित ‘वैर्याने डाव साधला’ नाट्य पुस्तकाचे प्रकाशन आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले.
पावसाळ्यात आयोजित स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिभावंतांनी आपल्या कवितांनी सोहळा अधिकच रंगतदार बनवला. यावेळी गझल कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये डॉ. अविनाश पाटील व पत्रकार अरविंद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, कल्याण, कर्जत आदी भागांतून आलेल्या साहित्यिकांनी आपल्या रचनांनी उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading